हे पुस्तक लिहिण्यामागे, या सगळ्या आठवणींबरोबरच, माझा अनुभव, मी आयुष्याकडून शिकलेल्या गोष्टी आणि समाजाचं ऋण फेडलं जावं म्हणून माझ्या हातून घडलेली सत्कृती, यांचाही वाटा आहे. स्वदेश-परदेश, तेथील सर्व उपक्रम, तिथे असताना आलेल्या अडचणी त्रास सगळ्यावर मी मात केली ती माझ्या आयुष्यातल्या दोन गुरुंमुळे तारेवरची कसरत करत पोटाची खळगी भरणारे डोंबारी आणि ‘तू चाल पुढं..’ हे ‘माणूस’ चित्रपटातले गीत. यांनी मला संकटांवर मात करून पुढे जायची प्रेरणा दिली.
या सगळ्या आठवणी या बकुळीच्या फुलांसारख्या आहेत. बकुळीची फुलं जशी वाळली तरीही सुगंध देत राहतात तशाच या आठवणी !! या आठवणींमधून वाचकांनाही नवी प्रेरणा मिळावी, दिशा सापडावी ही मनोमन इच्छा. ही बकुळीची फुलं तुमचेही आयुष्य सुगंधाने बहरवोत आणि तुम्हालाही यातून उमेद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.






Reviews
There are no reviews yet.